ओबीसी जनगणनेसाठी रासपचा दिल्ली येथे ०५ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा
_रायगड मधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दिल्लीत जाणार_
सचिन पाटील (अलिबाग)
रायगड: ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथे ०५ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, हा आंदोलन राष्ट्रनायक माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या आंदोलनात ओबीसी यांचा जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम ठेवणे, नॉन क्रिमिलरची अट रद्द करणे, ५०% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे,धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देने, महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलने, संपूर्ण शिक्षण मोफत, मोफत आरोग्य सुविधा पुरविणे या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात रायगड,रत्नागिरी सह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने रासपचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष कु.ओमकार सचिन साळुंखे यांनी केले आहे