नागपुरात तृतीयपंथीयांनी केले सामूहिक राष्ट्रगीताचे गायन
नागपूर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणजे स्वराज्य महोत्सवाचे आयोजन या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र, या सर्वांच्या गर्दीत लक्ष वेधले ते नागपूरच्या तृतीयपंथीयांनी. शहरातील अनेक तृतीयपंथी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्रित येऊन सामूहिक राष्ट्रगीत गायन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बरोबर ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये जो ज्या जागी असेल त्याचं जागी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले होते. या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र, या सर्वांच्या गर्दीत लक्ष वेधले ते नागपूरच्या तृतीयपंथीयांनी.
सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे स्वराज्य महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले. त्यानंतर अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय याचबरोबर खाजगी कार्यालयात देखील राष्ट्रगीत गायन करण्यात आले. एवढेच नाही तर नागपुरातील वर्दळीच्या देखील नागरिकांनी उस्फुर्तपणे राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.