स्व. शंकरराव चौखारे यांनी शेतकऱ्यांच्या यातनेला न्याय दिला; यशवंत तेलंग
नागपूर: येथील स्वर्गीय विदर्भ वीर जांभुवंतराव धोटे विचार मंच तर्फे संत कबीर सभागृह टिळक नगर नागपूर येथे आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लॉ राजाभाऊ खोब्रागडे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा घेण्यात आली.
याप्रसंगी अतिथी म्हणून योगेश ठाकरे राजश्री शाहू महाराज बहुजन परिषद चे अध्यक्ष समाजसेवक सुनील चोखारे मिथुन मोहरकर, रोहित कोचर, संजीवन वालदे, अनुज धनविजय प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वांनी शंकरराव चोखारेयांच्या प्रतिमेला पुष्पमाला व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून यशवंत तेलंग म्हणाले की, शंकरराव चोखारे यांनी शेतकऱ्यांच्या यातनेला न्याय दिला. त्याच्या कार्याची दखल माजी पंतप्रधान देवेगोडा चंद्रशेखर चरणसिंग यांनी दखल घेऊन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सोबत घनिष्ठ संबंध शेतकऱ्यांच्या कार्यात दखल घेतली.
अशा व्यक्तीमत्त्वाचे स्मरणार्थ गरीब शेतकऱ्यांना दहा लाखाची विमा पॉलिसी देण्यात येईल तेव्हा त्यांच्या कार्याची चळवळ कार्यरत ठेवणारे सुनील चोखारे यांना डॉ. आंबेडकर सन्मान पुरस्काराने राज्य व केंद्र सरकारने बहाल करावा. अशी मागणी यशवंत तेलंग व योगेश ठाकरे यांनी केली. ग्रामीण भागात त्यांचे नाव या मार्गास देण्यास यावे. असे निवेदन राज्य केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याचे यशवंत तेलंग यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना 10 लाखाची बिमा पॉलिसी लागू करावी. श्रद्धांजली सभेत रिपा, शिवसेना, रिपा आघाडी, लोकशाही मोर्चा, भारतीय किसान परिषद नागपूर, विकास मंच तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी संबोधन केले. संचालन संम्यक तेलंग यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीवन वालदे यांनी मानले.