‘सरकारच्या फार-काही भरवश्यावर राहू नका’; नितीन गडकरी
नागपूर: सरकारच्या फार-काही भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर श्रद्धा आहे. मात्र तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे कुणीही सांगत नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते नागपुरात आज ऍग्रोविजन फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ऍग्रोविजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, मी कालच माझ्या शेतातली चवळीच्या शेंगाची भाजी खाल्ली आहे. माझी शेती ऑरगॅनिक आहे. माझ्या शेतात पिकणारे उत्पादन मी पूर्ती बाजारमध्ये विकत नाही. मी अधिक भाव देणारा भाजी विक्रेता शोधला आहे. त्याचं प्रमाणे आपल्या उत्पादनाना कोण अधिक बाजारभाव देऊ शकतो हे ज्याचे त्याने शोधले पाहिजे असं देखील गडकरी म्हणाले.
प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाही – ऍग्रोविजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी अनेक गमतीदार किती सांगितले ,त्यामुळे लोकांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की आपल्याकडे दोनच गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. एक तर सरकार दुसरे म्हणजे परमेश्वर. मात्र प्रयत्न केल्याशिवायकुणालाही काही मिळत नसल्याचं गडकरी म्हणाले.