कवयित्री ज्योती चारभे यांना साहित्यगंध पुरस्कार प्रदान
वर्धा: येथील प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका ज्योती चारभे यांचा आज दि.२२/११/२०२२ रोजी मराठीचे शिलेदार समूहातर्फे यंदा जाहीर झालेला मराठी साहित्यक्षेत्रातील मानाचा ‘साहित्यगंध’ पुरस्कार श्री.चरणदास चारभे, केंद्रप्रमुख आर्वी जि. वर्धा हस्ते प्रदान करण्यात आला.
कवयित्री चारभे यांचे साहित्यक्षेत्रात अतुलनीय योगदान असून त्या मराठी भाषा सक्षमीकणासाठी सदोदित प्रयत्न करीत असतात. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.