उद्धवजी तुम्हाला लाज कशी वाटली नाही?
मुंबई: अनेक महिन्यांनी घरकोंबडे उद्धव ठाकरे खुराड्यातून बाहेर पडले, निमित्त होते चिखली येथे शिउबाठा तर्फे आयोजित शेतकरी मेळावा!
खरंतर शेतकऱ्यांच्या मेळाव्यात उधोजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवे होते, “सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, “शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देऊ”, “शेतकऱ्यांना १०,००० प्रतिमाह मदत करू” या २०१९ पूर्वी दिलेली आश्वासने २०१९-२०२२ या काळात आपण मुख्यमंत्री असताना पूर्ण का झाली नाही. याचा खुलासा करायला हवा होता.
परंतु शेतकऱ्यांच्या मेळाव्यातही उधोजींचे लक्ष राज्यपालांच्या धोतरात, शिंदे गटाने केलेल्या फजितीत आणि गमावलेल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतच अडकले होते! परंतु टोमणे मारण्याचे सुख घेताना उधोजी इतके दंग झाले की
स्वतःची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी करून बसले. हे थोडे म्हणून “शिंदे गटाचे बंड पाहून शिवरायांना किती यातना झाल्या असतील” असेही बोलून गेले…
तुमचा पक्ष फुटला यासाठी महाराजांना यातना का व्हाव्यात?
गेल्या अडीच वर्षात तुम्ही असा कुठला पुरुषार्थ दाखवला ज्यामुळे महाराजांना तुमचा अभिमान वाटावा?
छत्रपती शिवरायांच काय, खुद्द तुमचे वडील स्वर्गीय बाळासाहेबांनाही प्रचंड यातना झाल्यात ना, पण त्या कशामुळे झाल्या माहिती आहे…? जरा विचार करा उत्तर आपोआप सापडेल.
तूर्तास एवढेच….!!!