आंतरजिल्हा बदली झालेल्यांना कार्यमुक्त करण्यासाठी ‘सिईओ’ ना निवेदन
वर्धा: मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा वर्धा व शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज दि (११ मार्च) रोजी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशा आशयाचे स्वजिल्ह्यात जाणा-या शिक्षकांनी निवेदन दिले.
‘जि.प. भंडारा व जि.प. गोंदीया यांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना स्वजिल्हयात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा स्वजिल्ह्यात रुजू होण्यासाठी आदेशित करावे ही विनंती निवेदनात करण्यात आली.
तसेच पवित्र पोर्टलव्दारे राज्यात शिक्षक भरती झालेल आहे. ते नविन शिक्षक जर आमचे आधी आमच्या जिल्हयात् रुजू झाले तर आम्ही सेवाजेष्ठ असून सुद्धा त्यांच्यापेक्षा सेवेमध्ये कनिष्ठ होवू हा एकप्रकारे आमच्यावर अन्याय होईल. वरील बाब लक्षात घेता आम्हाला स्व जिल्हयात रुजू होण्याकरीता कार्यमूक्त करावे असे विनंती करणारे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी खडसे सर, राहुल पाटील, दहिवले मैडम, विशाल केदार , अमोल जुगनाके यांच्यासह सर्व आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक उपस्थित होते.