शिवराज्याभिषेक वर्धापन दिन समारोह थाटात संपन्न
नागपूर:शिवराज्याभिषेक वर्धापन दिन समारोह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी, नागपूर येथे सोमवार दिनांक. ६ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारोहाचे उदघाटन शालिक जिल्हेकर (जेष्ठ नाटककार, कवि, नागपूर ) यांच्या हस्ते करण्यात आले आणि शिवराज्याभिषेक समारोहाला अध्यक्ष म्हणून संगीतभाई फुलझेले (आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत, चंद्रपूर) हे उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक समारोहासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जावेद पाशा ( लेखक, कवी, नाटककार, कलावंत, नागपूर ) प्रा. नूतन माळवी ( साहित्यिक , लेखिका, वर्धा ) प्रा. डॉ. मनोहर नाईक (आंबेडकरी साहित्यिक कवि , विचारवंत, नागपूर) प्रा. माधुरी गायधनी (नागपूर ) हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. जावेद पाशा यांनी इतिहासातील दाखले देत आपल्या भाषणाला सुरूवात केली. आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर हल्ला करणाऱ्या व्यवस्थेचा खरपूस समाचार घेतला.
याप्रसंगी प्रा. नूतन माळवी म्हणाल्या, ” तरूण पिढीला जागे करण्याची नितांत गरज आहे. ” मनोहर नाईक आपल्या भाषणात म्हणाले, ” ओबीसी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच परिवर्तन शक्य असल्याचे डॉ. मनोहर नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रा. माधुरी गायधनी यांनी म्हटले, ” चळवळीला गर्दीची नाही तर दर्दीची गरज असल्याचे सांगितले. “प्रा. डॉ. “भव्य शिवराज्याभिषेक वर्धापन दिन समारोहात भारतीय पारंपारिक पहनावा प्रतियोगिताचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. शिवराज्याभिषेक वर्धापन दिनाचे आयोजन केल्याबद्दल समितीच्या सचिव समिक्षा फुलझेले यांचे सर्वच वक्त्यांनी भरभरूण अभिनंदन केले.
या आगळया वेगळया शिवराज्याभिषेक समारोहास नागपूर येथील शिवबा- फुले- शाहू -आंबेडकर चळवळीतील बहुजन समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.