‘विरांगणा राणी दुर्गावती अमर रहे’ च्या घोषणांने दुमदुमली रामटेक नगरी
_विरांगणा राणी दुर्गावती यांना विनम्र अभिवादन_
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: आदिवासी समाजाची महान विरांगणा राणी दुर्गावती यांच्या बलिदान दिनानिमित्त रामटेक तालुक्यातील बोथिया-पालोरा येथे दि २४ जून रोजी गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विरांगणा राणींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व नागपूर जिल्हा परिषदेतील क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य हरीशभाऊ उईके यांनी राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समाज, देशाच्या प्रती त्यांच्या महान योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाज आणि देशासाठी राणी दुर्गावती यांनी आपले संपूर्ण जीवन लावले, आणि प्रसंगी स्वतःचे बलिदान दिले. त्यांचे महत्कार्य हा देश कधीही विसरणार नाही. समाज त्यांचा सदैव ऋणी राहील असे भावोद्गार हरीशभाऊ उईके यांनी याप्रसंगी काढले.
विरांगणा राणींना अभिवादन करण्यासाठी याप्रसंगी प्रामुख्याने कोया पुणेम भुमक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अहिरावेन इनवाते, ग्रामपंचायत बेलदा येथील सरपंच उमेशभाऊ भांडारकर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “राणी दुर्गावती अमर रहे” ‘जब तक सुरज चांद रहेगा’ विरांगणा राणी दुर्गावती का नाम रहेगा, आणि जय सेवा या घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते.