‘जुनापाणी’तील ग्रामस्थांना मदत मिळण्याची मागणी
नागपूर: दि15 जुलै रोजी सकाळी ५ वाजता तलाव फुटल्यामुळे जुनापाणी हे गाव बुडाले गावातील आदिवासी लोकांच्या घरचे जनावरे, अन्नधान्य, कपडेलत्ते, सगळं साहित्य, वाहून गेलेत. तेथील अदिवासी बेघर झालेले आहे. याकरिता सरकारने मदत करावी ,अशी मागणी बिरसा मुंडा आदिवासी कल्याण महासंघ आणि गोंड राजे, बख्त बुलंदशहा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पत्रपरिषदेमध्ये मागणी करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नजीक जुनापाणी या गावात मुसळधार पावसामुळे १५ जुलै रोजी सकाळी ५ वाजता. तलाव फुटला आणि त्या गावातील भयंकर पूर आला. पुरामुळे गावातील अन्नधान्य, गुरेढोरे, कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्यात. अशा पुरग्रस्त आदिवासी लोकांना सरकारने मदत करावी. या गावातील 72 लोकांचे नुकसान झालेले आहे. याच्या अंगावर जो कपडा आहे फक्त तेवढाच उरलेला आहे बाकी सर्व घरातलं अन्नधान्य, गो गुरे – ढोरे -वासरे, गाई, बकऱ्या, सर्व वाहून गेलेत आणि आज ते बेघर झालेत. यांना न्याय मिळालाच पाहिजे. याकरिता पत्रपरिषद मध्ये मागणी केली आहे. सरकारने आदिवासी गोर गरिबांची मदत करायलाच पाहिजे.
याकरिता परिषद घेण्यात आली व पत्रपरिषदेत सविस्तर सांगण्यात आले. यावेळी अध्यक्ष भाऊ खुरसंगे, संजीवनी कुमरे अध्यक्षा, जयश्री मसराम, डॉ. नरेंद्र कोडवते. आणि भाग्यश्री सुरपाम, मनिष वासे, शेखर उइके, मुकेश खुरसंगे उपस्थित होते.