वाडी शहरातील मोठ्या नाल्यावर असलेले अवैद्य बांधकाम काढा
_न.प. वाडी मुख्यधीकारी विजय देशमुख यांना मनसेची मागणी_
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- पावसाळ्याचे पाणी नगर परिषद वाडी हद्दीतील अतिवृषटीमुळे बऱ्याच लोकांच्या घरात पाणी शिरते अनेक जनतेचे नुकसान झाले आहे. मुख्य नाल्यावर असलेले अनाधिकृत बांधकाम. अतिक्रमण करून नाल्यावर बांधकाम केले आहे. म्हणून पावसाचे पाणी बाहेर जात नाही नगर परिषद वाडी यानी नाल्यावर बांधकामाची परवानगी दिली कशी दिली नसेल तर बांधकाम केले कसे असा प्रश्न वाडीतील जनता नगर परिषद प्रशासनाला विचारत आहे.
अनेक लोकांच्या घरात पाणी घुसले हे सत्य आहे. अशाच प्रकारचे हाल दरवर्षी वाडीत पावसाळ्यात पाहायला मिळतात याकडे नगर परिषद प्रशासन जाणीवूर्वक दुर्लक्ष करीत आहे का ?असा ही प्रश्न जनतेच्या मनात घर करीत आहे.
नाल्यावर कोणाचे अतिक्रमण करून बांधकाम केले असेल किंवा नाला बुजला असेल तर तुरंत संबंधितावर कार्येवाही करून नाला मोकळा करावा ही मनसे ची नगर परिषद वाडी मुख्यधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
मनसे प्रदेश सरचिटणीस मा.हेमंतभाऊ गडकरी,जिल्हा अध्यक्ष सतीषभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे,मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी,ओंकार तलमले,संदीप माने,अश्विन कोडापे,संतोष पाल,वैभव तुपकर,अजिंक्य वाघमारे, विठोबा घुरडे,सूरज भलावी,नितीन पिठोरे,बबलू सिंग,मुकेश मुंडले,आकाश बाबर,अतुल मिश्रा,भरत ठोंबरे, शुभम बुरबुरे,लकी आडे,मनसे कार्यकर्ते उपस्थीत होते.