अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी
_छावा क्षात्रवीर सेनेच्या महिला विदर्भ अध्यक्षा प्रतिभा तातेड यांची मागणी_
अनिल पारखी
यवतमाळ: जिल्ह्यातील पाऊसाच्या आतिवृष्टीमुळे. नदी नाल्यांना पुर पाणी जमा झाले व धरण भरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालाचे व घरांचे नुकसान झाले तिहेरी पेरणी करावी लागणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे . तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे छावा क्षात्रविर सेना तर्फे मा एस डी ओ वणी यांच्या मार्फत मा जिल्हाधिकरी यांना निवेदनातून मागणी केली आहे शेतकरी व धरणाचे काही दरवाजे खोलल्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पाणी गावात साचून राहिल्याने अनेक नागरिकांचे भरपूर नुकसान झाले आहे आणि अतिवृष्टी मुळे बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतातील उभे पिके खराब झाली अगोदरच दुबार पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट बनली असतांना त्यात पुन्हा पावसाच्या रूपाने अस्मानी संकट कोसळले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनावर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली असल्याने शासनाच्या वतीने तत्काळ झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी व तसेच या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांची सुद्धा पडझड झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याना तत्काळ नुकसान भरपाई आर्थिक मदत येत्या दहा दिवसात देण्यात यावी.
अन्यथा छावा क्षात्रविर सेनेच्या वतीने शेतकरी व नागरिकांच्या भरपाई साठी तीव्र आंदोलन करण्यात याची दखल प्रशासनाने घ्यावी काही अणुचीत प्रकार घडला तर प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा छावा क्षात्रविर सेना प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी,व विदर्भ महीला अध्यक्ष सौ प्रतिभा ताई तातेड यांनी दिला.
यावेळी यांच्या छावा क्षात्रवीर सनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे, यांच्या मार्गदर्शनाखाली व महीला विदर्भ अध्यक्ष सौ प्रतिभा ताई तातेड ,विदर्भ अध्यक्ष विलास बूराण ,जिल्हा अध्यक्ष सतीश पारखी , जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे,तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर, महीला तालुका अध्यक्ष सौ मंजुषा पेंदोर, पृथ्वीराज घोटेकर, अभिषेक उपरे, संकेत लांबट व अजय लांबट कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.