हरामखोर कोश्यारी जोडे मारायच्याच लायकीचा !
भगतसिंग कोश्यारी हा माणूस आता महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणवून घेण्याच्या जराही लायकीचा राहिलेला नाही.राज्यपाल या पदाचे जेवढे अवमूल्यन या व्यक्तीने आतापर्यंत केले,तेवढे संपूर्ण देशातही कोणत्याच राज्यपालाने केले नसेल.इतका नालायक,बेशरम,कुत्सित वृत्तीचा,महाराष्ट्र द्रोही माणूस महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकांना कसा चालतो हा सुध्दा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे.हा माणूस घटनात्मक पदावर असूनही एका पक्षाच्या बाजूने राजकीय भूमिका तर घेतोच,पण महाराष्ट्राचे दैवत,अस्मिता असलेल्या महापुरुषांवरही घाणेरड्या पध्दतीने टिका करतो.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यासारख्या महापुरुषांबद्दलही याच्या भावना इतक्या व्देषाने आणि विषाने भरलेल्या आहेत की याला भर रस्त्यावर जोडे मारायला पाहिजे.घटनात्मक पदावर आहे म्हणून या हरामखोराचा किती दिवस मान ठेवायचा ? अरे,या पदापेक्षा आमचा मराठी माणूस,मराठी माणसांची अस्मिता,मराठी माणसांची दैवते,महामानव हे सर्वात मोठे आणि पूज्यनीय आहेत.घटनात्मक पदावर आहे म्हणून किती दिवस या हलकट माणसाची नालायकी सहन करायची ? हा नीच माणूस मराठी माणसांचे योगदान नाकारुन दुसऱ्यांना श्रेय देतो,गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या समाजासमाजामधे भांडणे लावतो,मुद्दाम मराठी लोकांना डिवचतो ; तरी याची बदमाशी महाराष्ट्राने सहन करायची !
मराठी माणसाने अशा महाराष्ट्र व्देषी व्यक्तीच्या विरोधात जात,धर्म,पक्ष विसरुन एकत्र आले पाहिजे.हा कोण्या पक्षाचा प्रश्न नाही.हा मराठी माणसाच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे.याच मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे.याच मराठी माणसाने देशाचे संविधान लिहिले आहे.याच मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवरायांनी देशाला स्वाभिमान शिकविला आहे.याच मराठी माणसाने अनेक राज्यातील लोकांना आसरा देवून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे.मराठी माणसाच्या घामावर,श्रमावर आणि रक्तावर हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे.त्या मराठी माणसाविषयी महाराष्ट्रात येवून हा भाडोत्री माणूस एवढे घाणेरडे, विकृत बोलण्याची हिंमत कोणाच्या भरवशावर करतो ? ज्या लोकांना मराठी माणसापेक्षा आपला पक्ष आणि पक्षहीत महत्वाचे वाटत असेल त्यांनाही आता त्यांची जागा दाखवली पाहिजे.कारण महाराष्ट्रात येवून इथल्याच लोकांच्या विरोधात गरळ ओकली जात असेल तर त्यांना प्रेमाची नाही तर फक्त दंडुक्यांचीच भाषा समजू शकते.त्यामुळे अशा हरामखोर राज्यपाला विरोधात समस्त मराठी माणसाने संघटीतपणे उभे राहून त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे.कारण आता हा कोश्यारी समजून सांगण्याच्या वर गेला असून तो जोडे मारायच्याच लायकीचा राहिला आहे.
✍🏻 प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी..