आदिवासी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्त्यांना ऐक्य करणे ही काळाची गरज.
नागपूर : संविधान निर्मात्याला जितकी काळजी अनुसूचित जाती ची होती, तितकीच अनुसूचित जमाती आणि ओबीसी भटक्या विमुक्त समाजाची होती. त्यामुळेच आज संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून आदिवासी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्त्यांना ऐक्य करणे हि काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी योजना अधिकारी रमेश ऊईके यांनी केले ते आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यालयात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाचे लेखा अधिकारी आनंद गोरे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छाया चित्रावर माजी नगरसेविका पद्मामा ऊईके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, ओबीसी नेते राजू दादा पांजरे, अँड सुरेश घाटे, यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात चरणदास गायकवाड, हेमंत वाबिटकर, नरेंद्र भांजे, दिलिप एंगड, दिलिप काकपूरे, मनोहर इंगोले, रवी ऊईके, गणेश ऊईके, ईत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रमेश दुपारे यांनी तर आभार ज्ञानेश्वर ढेगंरे यांनी मानले.