आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ व्या वर्षी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
नागपूर: स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ व्या वर्षी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळत नाही व देशातील महिलांना पूर्णपणे संरक्षण मिळत नाही तेव्हा पर्यंत पूर्णपणे स्वातंत्र्य मानता येणार नाही. CITU तर्फे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ व्या वर्धापन दिन अभियान निमित्त भंडारा येथे एका जाहीर सभेमध्ये आशा वर्कर गटप्रवर्तक यांना सीटू अध्यक्ष -कॉ. राजेंद्र साठे यांनी मार्गदर्शन केले.
भारताला इंग्रजांकडून मुक्त करण्याकरता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्वप्न बघितले होते ते स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊन सुद्धा पूर्ण होऊ शकलेले नाही. शेतकरी शेतमालाला योग्य भाव मिळावा त्याकरता संघर्ष करत आहेत. त्यांना आत्महत्येला परावृत्त केल्या जात आहे. शेतमजूर पेन्शन योजना लागू होईल याची वाट बघत आहेत. आशा व अंगणवाडी कामगारांची दशा दिवसें-दिवस बिकट होत चाललेली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा केव्हा मिळेल याची वाट बघत आहेत. महागाई भरमसाठ वाढलेली आहे गरीब आणखी गरीब होत आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेला आहे आणि सरकारी संपत्ती विकून मूठभर उद्योगपत्यांची तिजोरी भरण्याचे काम ही मोदी सरकार करत आहे. आजही महिलांवरील अत्याचार थांबलेले नसून अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. अत्याचारी लोकांना मोदी सरकार तर्फे राजकीय संरक्षण देणे चालू आहे. मोदी सरकार देशातून इतर सर्व पक्षांना ईडीचा धाक दाखवून संपवण्याचा प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाच्या समापन नंतर वरील कार्यक्रमाला कॉ.मोहम्मद ताजुद्दीन, कॉ.राजेंद्र साठे, कॉ. मंगला जूनघरे, कॉ.प्रीती मेश्राम, कॉ.सुनंदा बसेशंकर, कॉ.उषा मेश्राम कॉ. मंदा मस्के, महानंदा बसेशंकर, मंगला गौरी, वैशाली सोमकुवर, सुषमा कारेमोरे सोबत ई. आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.