वयाची पंचाहत्तरी पार केलेल्यांना ‘लालपरी’चा मोफत प्रवास
_शिंदे सरकारनी आज घेतले महत्वाचे निर्णय_
मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने सर्वसामान्यांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शिंदे सरकारने गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
_गोविदांना मिळणार १० लाखांचा विमा_
गोविंदा पथकांना शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. नुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
_कर्मचाऱ्यांच्या खात्यात DA अरियरचे पैसे जमा_
दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती उत्सवापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्यानं कर्मचारी आनंदात आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्के वाढ केलीय. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.