राज्यातील प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचे आदेश २२ रोजी प्राप्त होणार
_जिल्हांतर्गत बदल्यांचा मुहूर्तही लगेचच_
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दि.१९ ऑगस्ट २०२२ ही सर्व प्रकारच्या बदली संवर्गाच्या पळताळणी करिता अंतिम मुदत ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे.आज रात्री १२ वा.नंतर पोर्टल बंद करण्यात येणार आहे.तेंव्हा रात्री १२ पूर्वी चुकीचे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया होणार आहे.नंतर लगेच रात्री १२ वा.नंतर आंतरजिल्हा बदली करिता संगणकीय प्रणाली सुरू होणार आहे.
दि.२० व २१ रोजी आंतरजिल्हा बदली ची संगणकीय प्रणाली द्वारे रिक्त व साखळी दोन्ही प्रक्रिया होणार असून सोमवार दि.२२ रोजी बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश पोर्टल वर उपलब्ध करण्याचे ग्रामविकास विभागाचे प्रयत्न आहेत किंबहुना ते उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. बदली प्रक्रिया लवकरात लवकर वेळेत पूर्ण होण्यासाठी ग्रामविकास विभागाचे जलद प्रयत्न आहेत.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.त्यासाठीचे पूर्वनियोजन ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तश्या सूचना शासन स्तरावरून संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.