राज्यव्यापी राजकीय परिवर्तन मेळावा 4 ऑक्टोबर रोजी
_कार्यकर्त्यांमुळेच समाज जिवंत आहे; नारायणराव बागडे_
नागपूर: आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लीकन मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला राजव्यापी राजकीय परिवर्तन मेळावा घेण्याचे आवाहन केले आहे. आज नारायणराव बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, येत्या 4 ऑक्टोबर रोजी, राज्यव्यापी राजकीय परिवर्तन मेळावा टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात येत्या 4 ऑक्टोबर रोजी, दुपारी 2 वाजता. आयोजित करण्यात आलेला आहे. त्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे तसेच उद्घाटक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
तसेच प्रमुख अतिथी पाहुणे पंढरीनाथ गायकवाड मुंबई, शारीश डोळस मुंबई, रविंद्र जाधव नाशिक, शिवाजी मस्के पालघर, कल्याण देहाडे मराठवाडा, कविता घाडगे पुणे, एडवोकेट सुरेश घाटे विदर्भ, हे यावेळी उपस्थित राहतील. आणि स्वागताध्यक्ष प्रा.रमेश दुपारे यांची उपस्थिती राहतील.
आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाच्या गटातटा मुळे होत असलेले परिणाम, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची राजकीय परिवर्तन, दलित बौद्ध, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, आदिवासी मुस्लिम समाजातील सामाजिक आर्थिक प्रश्न प्रश्नांच्या बाबींवर विचार विमर्श करून ठराव पारित करण्यात येईल. अशी माहिती दिली आहे. यावेळी पत्रपरिषदेमध्ये नामदेवराव निकोसे, प्रवीण आवळे, रुबीना खान, राजुदादा पांजरे, प्रा.रमेश दुपारे के.टी. कांबळे, आनंदराव गोरे, हंसराज उरकुटे, पंढरीनाथ बागडे आणि आंबेडकर विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांची उपस्थिती होती.