साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभ, पुरस्कार वितरण व कवी संमेलन आता ‘या’ सभागृहात

साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभ, पुरस्कार वितरण व कवी संमेलन आता ‘या’ सभागृहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मराठीचे शिलेदारांचा ‘काव्यजागर’ लातुरात ३ नोव्हेंबर रोजी

नागपूर: महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या, नागपूर येथील नामांकित व मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र मागील आठ वर्षापासून यशस्वीपणे कार्य करीत असलेल्या ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय व प्रकाशन संस्थेच्या यंदाचा ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ, पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय काव्यसंमेलन आता भालचंद्र रक्तपेढी, रेडक्रॉस भवन सभागृह, गांधी मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक, लातूर येथे दि ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० ते ७.३० पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

प्रकाशन समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती सविता पाटील ठाकरे, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, सिलवासा, दादरा नगर हवेली या असतील, तर राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्धी कवयित्री व लेखिका शर्मिला देशमुख, बीड या उपस्थित राहणार आहेत. तसेच लातूर नगरीचे भूषण असलेल्या इतर मान्यवरांचीही या समारंभात उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी राज्यातील ९० कवी, कवयित्री व लेखकांना साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, राज्यातील व राज्याबाहेरील निवडक ३३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच आपले आयुष्य शिक्षणासाठी वाहिलेल्या पाच मान्यवरांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय प्रकाशन समारंभास राज्यातील विविध भागातील लेखक, कवी व साहित्यिक हजेरी लावणार असल्याने सर्व साहित्यिकांसाठी नागपुरी-वऱ्हाडी बोलीतील
धमाल किश्शांचा एकपात्री कॉमेडी कार्यक्रम! “आपल्याले का करा लागते!’ निरंजन मार्कंडेयवार प्रसिद्ध लेखक व पत्रकार सादर करणार आहेत. लातूरकरांसाठी ही दीपावलीनिमित्त साहित्याची पर्वणी असल्याने या समारंभास आवर्जून उपस्थित राहावे. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशनाचे प्रसिद्ध व निवडक कवितासंग्रह सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात तब्बल ५५ निमंत्रित कवी कवयित्री आपल्या दर्जेदार रचना सादर करणार असल्याचे, मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles