राज्यस्तरीय उत्कृष्ट विचारलेखन पुरस्कारासाठी ‘विचारक्षण’ची निवड
चंद्रपूर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने साहित्याच्या विविध प्रकारातील पुस्तके मागविण्यात आली. त्यात लोककलावंत पैगंबरवासी मजनू भाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मृतीपित्यर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट विचारलेखन पुरस्कारासाठी जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्याचे समूह निर्माता तथा जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक गणेश कुंभारे ब्रम्हपुरी यांच्या विचारक्षण या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. तसे निवडपत्र दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार रज्जाक शेख यांनी पत्राद्वारे कळविले आहे. दि. ४ डिसेंबर २०२२ ला श्रीरामपूर येथे त्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
गणेश कुंभारे लिखीत विचारक्षण या पुस्तकात १४० विचार अंकित केले असून त्यात स्वानुभवाच्या व निरीक्षणाच्या आधारे चिंतनातून विचार मांडले आहेत. या पुस्तकाला दुशांत निमकर, गोंडपिपरी यांची प्रस्तावना असून प्रा. डाॅ. हितेंद्र धोटे ब्रम्हपुरी यांचे पाठराखणपर मनोगत आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मित्रमंडळींकडून मराठीचा जागर चालविणारे गणेश कुंभारे यांचे अभिनंदन होत आहे.