जिजाऊ जन्मोत्सव, मराठा जीवनगौरव पुरस्कार व शैक्षणिक गुणगौरव सोहळ्याने दुमदुमली सिलवासा नगरी
_विशेष अतिथीच्या उपस्थितीत ८४ विद्यार्थ्यांना पुरस्कार_
सविता पाटील ठाकरे, कार्यकारी संपादक
सिलवासा: दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे दिनांक 7 जानेवारी 2023 वार शनिवार रोजी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री टॉवर कम्युनिटी हॉल येथे जिजाऊ जन्मोत्सव, मराठा जीवनगौरव पुरस्कार व शैक्षणिक गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला. कोरोनानंतर असा भव्य दिव्य सत्कार समारंभ मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडने आयोजित केल्याने जिजाऊ जन्मोत्सव, मराठा जीवनगौरव पुरस्कार व शैक्षणिक गुणगौरव सोहळ्याने सिलवासा नगरी अक्षरश: शैक्षणिक वातावरणात दुमदुमून गेली होती.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादरा नगर हवेली जिल्हा शिक्षणाधिकारी मा. बी. बी. पाटील तर विशेष अतिथी म्हणून मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचे संस्थापक, अध्यक्ष मा. राहुल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.अनंतराव निकम तसेच जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सविता ठाकरे कार्याध्यक्ष भाऊसाहेब डेरे, संदीप पाटील, मंगलाताई निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिजाऊ वंदना करून सर्वांनी जिजाऊंना मनोभावे भावपुष्पांजली अर्पण केली. आपल्या प्रास्ताविकातून कार्याध्यक्ष मा.भाऊसाहेब डेरे यांनी मराठा सेवा संघाच्या भावी उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली व लवकरच मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली येथे आपल्या उपक्रमातून आपली भूमिका बजावेल आणि लोकाभीमुख काम करेल असे आश्वासन दिले.
जिजाऊ जयंती विषयी आपल्या मनोगतातून प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीत व बदलत्या वातावरणात शिवरायांच्या विचारांची गरज विषद केली व विद्यार्थ्यांमधील मरगळ झटकून काढण्यासाठी प्रयत्नवादाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ.भरत सोनवणे, डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर मयूर बोरसे व कुमारी ऋतुजा पाटील यांचा मराठा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दहावी व बारावीच्या जवळपास 84 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यातून दहावीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी रितेश संतोष सोनवणे व बारावीतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी कुमारी ऋतुजा जगन्नाथ पाटील यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. दहावीचे मानकरी विद्यार्थी १. रितेश संतोष सोनवणे, २.पाटील भाविका संजय ३.परसाई करुणा राजू. बारावीचे मानकरी विद्यार्थी १. पाटील ऋतुजा जगन्नाथ २.सोनार वैभवी पुरुषोत्तम ३.जाधव मोहिनी नंदकिशोर यांचा समावेश आहे.
याप्रसंगी आपल्या भाषणात राहुल पाटील सर यांनी सांगितले की, स्वयंभू होण्याची हीच वेळ आहे. इतरांच्या हातचे बाहुले बनून जगण्यापेक्षा स्वत: परीश्रम करा, अभ्यासाने मस्तक हे पुस्तकासारखे होते हे कायम लक्षात ठेवा. उद्याचे राष्ट्रनिर्माते तुमच्यात आहे म्हणून जिद्द, चिकाटी, धैर्य आणि धाडस कदापी सोडू नका. तुमच्या अथक प्रयत्नाने आपला भारत उद्याही संपूर्ण विश्वात शोभून दिसेल असा मला विश्वास वाटतो. तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अनंतराव निकम म्हणाले की, दैववाद पेक्षा प्रयत्न वाद जास्त महत्वाचा वाटतो. प्रत्येकांनी आपापल्या क्षेत्रात मेहनत घ्या यशाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करा.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शिक्षणाधिकारी मा. बी बी पाटील सर यांनी आपल्या भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि भविष्यात उद्भवणा-या समस्या काय असू शकतात त्याचे निराकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. मुलांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांनी समजावून सांगितल्या. ते पुढे म्हणाले, की कष्ट करा जेही कराल ते मनापासून करा. परिश्रमाशिवाय या जगात फुकट काहीही भेटत नाही. तेव्हा पालकांनी मुलांवर विश्वास दाखवा. त्यांचे करीयर घडविण्यास त्यांना सहकार्य करा.
कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे सर यांनी केले तर आभार प्रांजली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महासचिव श्री योगेश सोनवणे उपाध्यक्ष श्री कुंदन बच्छाव श्री प्रफुल सोनवणे ,श्री शरद बोरसे ,श्री राजेंद्र वाघ ,कोषाध्यक्ष श्री राजेंद्र वाघ साहेब ,नितीन बोरसे ,संदीप पाटील, राजेंद्र भामरे ,पुरुषोत्तम पाटील चंद्रशेखर कनसे, हनुमंत हेड्डे यांनी परिश्रम घेतले. जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी सौ प्नांजली पाटील सौ मेघा वाघ सौ.मनीषा वाघ सौ.विद्या कणसे सौ. रामेश्वरी पाटील सौ.रीना भदाणे सौ.निलिमा पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.