अभ्यास माझा: सामान्यज्ञान
प्रश्न १ ला :- ” तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुगा ” असे कोणी म्हटले ?
१) सुभाषचंद्र बोस✅
२) लोकमान्य टिळक
३) भगतसिंग
४) पंडित नेहरू
प्रश्न २ रा :- मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते ?
१) बी. सी. दत्त✅
२) एम. एन. रॉय
३) म. गो. रानडे
४) सेनापती बापट
प्रश्न ३ रा : – आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?
१) सुभाषचंद्र बोस✅
२) कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन
३) भगतसिंग
४) शहानवाज खान
प्रश्न ४ था :- १९ व्या शतकातील आठव्या दशकात महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला.
१) औरंगाबाद
२) अहमदनगर✅
३) अकोला
४) सातारा
प्रश्न ५ वा : – चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रतिसरकरची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती ?
१) पुणे
२) सातारा✅
३) कोल्हापूर
४) नागपूर
प्रश्न ६ वा : – १८५७ साली मंगल पांडेंनी कोठे उठाव केला ?
१) दिल्ली
२) बराकपूर✅
३) बरेली
४) मीरत
प्रश्न ७ वा :- भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?
१) बाळ टिळक✅
२) पंडित नेहरू
३) महात्मा गांधी
४) सरदार पटेल
प्रश्न ८ वा :- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते ?
१) लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड डफरिन✅
३) लॉर्ड बेटिंग
४) लॉर्ड आयर्विन
प्रश्न ९ वा :- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र ..…….. यांनी घेतले.
१) ग. वा. जोशी✅
२) लोकमान्य टिळक
३) पंडित नेहरू
४) म. गो. रानडे
प्रश्न १० वा :- राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुः सूत्रीची घोषणा कोणी केली ?
१) दादाभाई नौरोजी✅
२) न्यायमूर्ती रानडे
३) गो. कृ. गोखले
४) फिरोजशहा मेहता
संकलन/सहप्रशासक
अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर
===========