मित्र
मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपते पण
सवय कधीच सुटत नाहीत.
“मित्र” नावाची ही दैवी देणगी
जीवापाड जपून ठेवा,
कारण..जीवनांतील
अर्धा गोडवा हा
मित्रांमुळेच असतो.
कोणीतरी विचारले
मित्रांमध्ये एवढे काय विशेष
नातेवाईकां पेक्षा.
त्यांना सांगितले,
मित्र हे फक्त मित्र असतात.
त्यात सख्खे,चुलत,मावस, सावत्र
असं काही नसते.
ते “थेट” मित्रच असतात.
“मैत्रीचे धागे हे
कोळ्याच्या जाळ्या पेक्षाही
बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहुनही
मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातानेही
तुटणारच नाहीत.
प्रत्येक दुखण्यावर
दवाखान्यात उपचार
होतातच असे नाही.
काही दुखणी
कुटुंब आणि मित्र मंडळी
यांच्या बरोबर हसण्या आणि
खिदळण्यानेही बरी होतात.
माणसाने
कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात “सावली”
म्हातारपणात “शरीर”
आणि..
आयुष्याच्या
शेवटच्या काळात “पैसा”
कधीच साथ देत नाहीत ,
साथ देतात ती
फक्त आपण जोडलेले
“जवळचे मित्र.
जीवन भर जगत राहा.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव.